मराठा इतिहास

आदर्श समाजासाठी मराठा आचारसंहिता

   अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने काही दिवसापुर्वी मराठा आमसभा संपन्न झाली. मराठा मोर्च्यामध्ये मराठा समाज एकत्र आला आणि मराठा समाजाच्या ज्वलंत समस्या विषयी संशोधन सुरु झाले. अशा वेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यासाठी आदर्श आचार संहितेची गरज असल्याचे स्पष्ट झाले; त्यामुळे अनिष्ट रुढी-परंपरात अडकलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर येथे मराठा महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता बनवण्यात आली आहे. परंतु अनिष्ट रुढी-परंपरात आणि …

Read More »

राजसंन्यास, धर्मवीर आणि शंभुप्रेमींची जबाबदारी

   महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ३ जानेवारी २०१७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाच्या दिवसातील एक ठरला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला रा. ग. गडकरी यांचा पुतळा काही तरुणांनी मध्यरात्री हातोडी, कुर्‍हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. काही वेळातच हा प्रकार सर्वदुर पसरला. या घटनेचे शंभुप्रेमींनी जोरदार समर्थन केले तथा नितेश राणेंनी त्या तरुणांचा शब्द दिल्याप्रमाणे उचित सन्मान केला तर गडकरी प्रेमींनी निषेद आणि संताप व्यक्त केला. …

Read More »

दादोजी कोंडदेव, छ.शिवाजी महाराज आणि सत्य

   ”दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य” अशा मथळ्याचा राजा पिंपरखेडकर लिखीत लेख “लोकसत्ता” मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध झाला. अर्थात तो लेख म्हणजे एक पुस्तक परीचय होता. श्यामसुंदर मुळे यांनी लिहिलेले “हिंदवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण ” याच पुस्तकाचा परीचय. या लेखामध्ये लेखकाने असे लिहिले आहे की, “दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती” तसेच “दादोजी यांचं शिवाजी …

Read More »

शिवरायांचे प्रेरक : रामदास स्वामी की तुकाराम महाराज ?

   विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच “शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी …

Read More »

छ.शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक की रयतेचे राजे ?

   विश्ववंद्य छ.शिवरायांच्या नावामागे अनेक बिरुदावल्या लावल्या जातात त्यात “गोब्राह्मणप्रतिपालक” ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे. हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते. यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात. ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील असो. ब्राह्मणांनी आजपर्यंत पवित्र म्हणून सांगितलेल्या गोष्टीपैकी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे गाय आणि ब्राह्मण. “गायींचा” आणि “ब्राह्मणांचा” प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते. मग प्रश्न असा आहे की शिवराय …

Read More »

शिवरायांकृत रामदासांना पत्र आणि वास्तव

   रामदास स्वामींवरील आक्षेपाचे खंडण करण्यासाठी सुनिल चिंचोलकर नामक लेखकाने “श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन” हे पुस्तक (चिंचोलकरांच्या मते ग्रंथ) लिहिले आहे. त्यामध्ये अनेक संघटना रामदासांवर करत असलेले आक्षेप आणि आरोप काहीअंशी खोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आपण ब्रह्मवृंद आहोत हे तो विसरलेला नाही. सुनिल चिंचोलकरने त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र दिलेले आहे आणि त्या पत्राच्या आधारे तो रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरुपदी बसवतो. …

Read More »

जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी….. ??

   संतश्रेष्ठ तुकोबांच्या हयातीत मंबाजी भट आणि त्याचे सर्व साथीदार यांनी तुकोबांचा खुप कडाडून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडविले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुका सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. नदीत बुडवूनदेखील तुकोबांचे अभंग लोकांत राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेंव्हा अभंग बुडवूनसुद्धा आणि तुकोबांना संपवूनही तुकोबा संपत नाही असं दिसून आलं तेंव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकोबांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले क्षेपक …

Read More »

शाहूछत्रपती आणि तथाकथित अनुयायी

सातशे संस्थानी अशी शक्ती । एक कोल्हापूरी शाहूमुर्ती । अलौकीक विलायतेत किर्ती ॥ जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला ज्ञानरवी झाला । शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार । म्हणुन शाहू प्रभू शिव अवतार ॥    राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता आणि संपत्ती ही एक सामाजिक दृष्ट्या नैतिक जबाबदारी आणि ठेव समजून आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्वभावातील मानवतेचे दर्शन त्यांच्या जीवनकार्यातून प्रेतीत होते. एकवेळ राज्य गेले तरी चालेल पण …

Read More »

मराठा स्वराज्याची निशाणी : भगवा

   इतिहासामध्ये रामदासांचे महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक कथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत. एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे “महात्म्य” प्रसिद्ध केले जाते, त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासांच्या चरित्रातही घुसडलेल्या पाहायला मिळतात. गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याचशा रामदासांच्या चरित्रात आलेल्या पाहायला मिळतात. या रामदासी कथांबद्दल लिहिताना “न.र.फ़ाटक” यांनी आपल्या “रामदास …

Read More »

स्वराज्याची निशाणी : भगवा, शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी

   इतिहासामध्ये रामदासांचे  महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक भाकडकथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत. एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे “महात्म्य” प्रसिद्ध केले जाते, त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासाच्या चरित्रातही घुसडलेल्या आहेत. गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत. त्यापैकी बर्याचशा रामदासाच्या चरित्रात आलेल्या आहेत. या रामदासी कथांबद्दल लिहिताना “न.र.फ़ाटक” यांनी आपल्या “रामदास व शिवाजी” या …

Read More »